मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सोयाबीनचे बाजारातील दर गडगडले शेतकरी वर्गात चिंता

सोयाबीनचे बाजारातील दर गडगडले शेतकरी वर्गात चिंता

सांगली - सोयाबीन या शेतीमालाचे बाजारातील दर घसरले आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची चिंता त्यामुळे वाढली आहे. सोयाबीन तेलाच्या आयातीमुळे स्थानिक बाजारातील हे दर घसरले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी गेली काही दिवस दरवाढीची अपेक्षा करीत आहेत. सोयाबीन पिकासाठी 4,800 रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे. पण खरेदी केंद्र नसल्यामुळे माल कुठे घालायचा हा प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा आहे.


सोयाबीनची ही खरेदी केंद्रे सुरू व्हायला किमान एक महिना लागणार आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे आहे. यंदा सोयाबीन लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाली असली तरी मालाची आवक फारशी होण्याची शक्यता नाही बाजारातील अस्थिर दरामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. सरकारी खरेदी केंद्रे लवकर सुरू झाली तर शेतकऱ्यांना ती फायदेशीर ठरणार आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक होते. या दोन्ही राज्यात सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करायला मंजुरी देण्यात आली आहे. सोयाबीनचे बाजारातील दर टिकून राहावे यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत अशी मागणी उत्पादक शेतकरी करीत आहेत.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट