मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी

स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी

मुंबई - राज्यातील सारथी , बार्टी , महाज्योती आणि टीआरटीआय या संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिकवणी संस्था गैरव्यवहार करत असतील तर त्याची चौकशी केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.

या स्वायत्त संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यासाठी निविदा मिळवण्यासाठी मंत्रालयात आणि अधिकाऱ्यांना तसंच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना तसंच प्रवेशासाठी देखील उमेदवारांना आमिष दाखवले जात असल्याचं सांगत भाजपाचे निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला , यावर उच्चस्तरीय प्रशासकीय समिती नेमण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.

या प्रशिक्षण कालावधीवर मर्यादा घालण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं शिरसाट यांनी सांगितलं. या प्रशिक्षणासाठी राज्यभरात १७६ संस्था संलग्न असून राज्य सरकारकडून या प्रशिक्षणासाठी प्रत्येक उमेदवार ३५ ते ४० हजार महिन्याला खर्च केला जातो त्याचा अहवालही दिला जातो ,मात्र काही उमेदवार अनेक काळ प्रशिक्षण घेत राहतात ,अन्य उमेदवारांना संधी मिळायला हवी असं शिरसाट यांनी सांगितलं.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट