मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या प्रमाणात 19 टक्के घट झाल्याचे EPFO अहवालात स्पष्ट

महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या प्रमाणात 19 टक्के घट झाल्याचे EPFO अहवालात स्पष्ट

मुंबई - भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगाने सुरू असून सर्वकाही आलबेल आहे असे सरकारच्या विविध वित्त संस्थांकडून वारंवार मांडले जात आहे. तरी देखील देशातील रोजगाराची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रासारख्य़ा उद्योगप्रधान राज्यातून गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी परराज्यात स्थलांतर केल्यानंतर आता राज्यातील रोजगाराच्या संधीमध्ये मोठी घट झाली आहे. EPFO च्या अहवालात मांडलेल्या आकडेवारीवरून ही घटलेली रोजगार संख्या स्पष्ट झाली आहे. राज्यात २०२२-२३ मध्ये ३०.२९ लाख नोकऱ्या होत्या पण २०२३-२४ मध्ये हा दर २४.४५ लाख एवढा खाली आला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील नोकऱ्यांचा टक्का साधारणपणे १९ टक्के कमी झाला आहे.

ईपीएफओच्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात देशभरात नोकरीवरुन काढलेले किंवा स्वच्छेने नोकरी सोडलेल्यांचे प्रमाण जास्त होते. हे प्रमाण यावर्षी 12.63 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात दिसले.

कोरोना काळानंतर नोकऱ्यांमध्ये फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात संधी मिळत होती. पपण आता नोकऱ्यांमध्ये घट होत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2022-23 या कालावधीत फ्रेशर्सना 1.14 कोटी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण 2023-24 मध्ये हा आकडा 1.9 कोटीवर आली. दुसरीकडे अनुभवी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये 13.5 टक्के वाढ झाल्याची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

कनिष्ठ पातळीवरच नव्हे तर मध्यम आणि उच्च पातळीवरही नोकऱ्यांचे प्रमाण घटले आहे. 2023-24 या वर्षात नोकऱ्यांमध्ये साधारण 25 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.

उत्पादन, निर्मती, सेवा आणि आयटी क्षेत्रात ही घट झाली आहे. जनरेटिव्ह एआय, ऑटोमेशन, रोबोटीक यामुळे कंपन्यांना लागणारी मनुष्यबळाची गरज कमी होत चालली आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट