Breaking News
राज्यात सर्वत्र तुफानी पाऊस, पूरस्थितीसाठी यंत्रणा सज्ज
मुंबई - गेल्या २४ तासांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात सर्वत्रच पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसामुळे धरणे पूर्ण भरल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे मुळा-मुठा नदी काठच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घसुन मोठे नुकसान झाले आहे. पुण्यामध्ये संपूर्ण सरकारी सुसज्ज असून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना सुरक्षीत स्थळी हरवण्यात येत आहे. NDRF टिम देखील जोमाने काम करत असून पूरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे काम करत आहे.
मुंबई नजिकच्या अंबरनाथ- बदलापूर शहरांमध्येही अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे येथून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी या नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कल्याण- कर्जत मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बदलापूरमध्ये देखील NDRF च्या टिम दाखल झाल्या आहेत.
मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar