मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ याच वर्षांपासून सुरु होणार - मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ याच वर्षांपासून सुरु होणार - मुख्यमंत्री

आमदार प्रताप सरनाईक यांची  तीर्थ दर्शन योजनेची मागणी मान्य 

पहिल्या वर्षी १० हजार ज्येष्ठ नागरिकांना घडवणार सरकारतर्फे मोफत तीर्थ दर्शन*

ठाणे - भाईंदर / प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ’मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना“ याच वर्षांपासून लवकरच सुरु होणार असून ६० वर्षा वरील भाविक ज्येष्ठ नागरिकाना त्याचा लाभ घेता येणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली मागणी व पाठपुरावा तसेच सध्या सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात हि योजना लागू कारण्याबाबत  लक्षवेधी सूचना आमदार सरनाईक यांनी मांडली होती. त्यावर यावर्षापासून हि योजना राज्यात तात्काळ लागू केली जाईल अशी घोषणा आज २९ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पहिल्या वर्षी जवळपास १० हजार गरीब गरजू श्रद्धाळू ज्येष्ठ नागरिकाना या योजनेतून त्यांच्या इच्छित तीर्थ क्षेत्रांचे दर्शन सरकारतर्फे घडवले जाईल , याबाबत निकष व नियमावली लवकरच जाहीर होईल , असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. 

हि योजना लागू करत असताना यात आपण एक धोरण ठरवूया. नियमावली करूया . ऑन  लाईन अर्ज मागवूया. दरवर्षाला किमान १० हजार लोकांना या योजनेतून आपण तीर्थ दर्शना साठी सरकार कडून पाठवू शकतो. अनेकांची तीर्थ दर्शनाला जाण्याची इच्छा असते पण बहुतेक लोक ऐपत नसल्याने ते जाऊ  शकत नाही. अशा गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी हि तीर्थ दर्शन योजना ताबडतोब याच वर्षी लागू केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना म्हणाले. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत होऊन गेले, ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला आणि सोबतच एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाऊ लागले. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे. येथे भक्ती मार्गाला वाहून घेतलेले लाखो लोक धर्म कार्य, समाज कार्य भक्ती मार्गाने करतात हे सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्र सरकार अनेक भव्य - दिव्य मोठे विकास प्रकल्प राबवत असून महाराष्ट्र राज्य नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे.  अशा या संत-वारकरी परंपरा असलेल्या आपल्या राज्यात, महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

राज्यातील जेष्ठ नागरिक ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत (महिलांच्या बाबतीत २ वर्षांची सूट), त्यांना देशातील विविध प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी यामुळे मिळेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) कडून यात्रेकरूंना विशेष ट्रेनने प्रवास, नास्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याचे पाणी, तीर्थक्षेत्रांवर राहण्याची व्यवस्था, आवश्यक असेल तेथे बसने प्रवास, तीर्थ यात्रेत गाईड, एकट्या जेष्ठ नागरिकाला केअर टेकर अशा सुविधा देऊन आपण राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवू शकतो. मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना लागू करण्यासाठी खर्चाची तरतूद, नियमावली, अंमलबजावणी यंत्रणा, ही योजना लागू करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊन ही योजना लागू करावी असे आमदार सरनाईक यांनी म्हटले होते. त्यावर आमदार सरनाईक यांनी आज लक्षवेधी सूचना देखील अधिवेशनात मांडली होती. सरनाईक यांची ही मागणी मान्य करत आता राज्य सरकारने ही  योजना तात्काळ लागू करत असल्याचे आज मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात जाहीर केले आहे.पैशाअभावी किंवा कोणी सोबत नसल्याने, पुरेशी माहिती नसल्याने अनेक जेष्ठ नागरिक इच्छा असूनही तीर्थ यात्रा करू शकत नाहीत. आता राज्य सरकार ही योजना सुरु करत असल्याने त्याचा फायदा हजारो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. 


सर्वाना योजनेत समाविष्ट करून घेणार - आमदार सरनाईक 

आपल्या हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ व अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्व आहे. त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे जेष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे भव्य-दिव्य श्री राम मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे अयोध्या राम मंदिर दर्शन करण्याचेही प्रत्येकाचे स्वप्न आहे. हिंदू, ख्रिाश्चन, शीख, बौद्ध, मुस्लिम, जैन धर्मींयांच्या महत्वाच्या तीर्थस्थळांचा आपण या योजनेत समावेश करू शकतो. जेष्ठ नागरिकांचे संघ "समूह तीर्थयात्रा" काढण्याचाही विचार करत असतात. त्यांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न आपले सरकार साकार करणार आहे असे आमदार सरनाईक म्हणाले. 

आज मुख्यमंत्र्यांनी माझ्या लक्षवेधीवर बोलताना ही तीर्थ दर्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. हि खूप आनंदाची बाब आहे.  ही तीर्थ दर्शन योजना अंतर्गत देशातील कोणकोणती तीर्थ क्षेत्र समाविष्ट करायची, त्याचबरोबर ट्रेन कशा  सुरु करायच्या, एकूणच या योजनेची अंमलबजावणी कशी करायची याबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट