मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दीर्घायुष्याचं कारण आतड्यांमधील जीवाणू!

जपानी शास्त्रज्ञांनी शंभर वर्षं आणि त्याहून अधिक काळ जगणार्‍यांबद्दल एक रहस्य सांगितलं आहे. एवढं दीर्घ आयुष्य लाभण्याला आतड्यांमधले विशेष प्रकारचे जीवाणू असतात, असं संशोधकांना  आढळलं आहे.  

हा जीवाणू दुय्यम पित्त आम्ल तयार करतो, जे संसर्गाशी लढण्यास मदत करतं. ते आतडं निरोगी ठेवतं आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास मदत करतं. टोकियो ‘केओ युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’ च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. आतड्यांमध्ये विशेष प्रकारचे जीवाणू आढळतात. त्याला आतड्यांचे बॅक्टेरिया किंवा आतडे मायक्रोबायोम असंही म्हणतात. आपण अन्न खातो तेव्हा हे जीवाणू अन्नघटकांचे तुकडे तुकडे करतात. यामुळे अन्न सहज पचतं आणि अन्नात असलेले पोषक घटक शरीरात शोषले जातात. ते वाईट बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. आतड्यांच्या जीवाणूंची संख्या कमी होते आणि हानिकारक जीवाणूंची संख्या वाढते तेव्हा अल्सरेटिव्ह कोलायटिससारखे पोटाचे आजार वाढतात.

शास्त्रज्ञांनी १६० वृद्धांवर संशोधन केलं. त्यांचं सरासरी वय १०७ वर्षं होतं. त्यांच्या शरीरात असलेल्या आतड्यांच्या जीवाणूंची तुलना ८५ ते ८९ वयोगटातल्या ११२ लोकांशी आणि २१ ते ५५ वयोगटातल्या ४७ लोकांशी केली गेली. शास्त्रज्ञांना आढळले, की शंभरपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये ८५-८९ आणि २१-५५ वयोगटातील लोकांपेक्षा दुय्यम पित्त सिडचे प्रमाण जास्त होते. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’च्या मते, पित्त आम्ल हाएक द्रवपदार्थ आहे. तो यकृताद्वारे तयार केला जातो आणि ते पित्ताशयात साठवलं जातं. ते पचनाला मदत करते. विशेषतः यकृत सोडल्यानंतर हे चरबीयुक्त अन्न पित्त आम्ल असलेल्या आतड्यांपर्यंत पोहोचतं आणि तिथे उपस्थित आतड्यातले जीवाणू त्याचं दुय्यम पित्त सिडमध्ये रूपांतर करतात. हे दुय्यम पित्त सिड शरीर निरोगी राखण्यास मदत करतं. हे जीवाणू गंभीर आजारांचा धोका कमी करतात. जपानी संशोधकांच्या मतेशंभर वर्षापर्यंत जगणार्‍यांमध्ये असे विशेष प्रकारचे जीवाणू महत्वाची भूमिका बजावतात आणि गंभीर आजारांचा धोका कमी करतात. संशोधक डॉ.केनिया होंडा म्हणतात की शंभर वर्ष वयोगट आणि आतड्यांमधल्या जीवाणूंमध्ये एक संबंध सापडला आहे; परंतु हे जीवाणू दीर्घायुष्याचं एकमेव कारण आहे हे पूर्णपणे सिद्ध होत नाही. यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. हा जीवाणूंच्या दीर्घायुष्यातला घटक असू शकतो.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट