मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बलुच आर्मीने पाक विरोधात दिला स्वातंत्र्याचा नारा

बलुच आर्मीने पाक विरोधात दिला स्वातंत्र्याचा नारा

इस्लामाबाद- : पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानची पुरती पिछेहाट केली आहे. पाकला विविध आघाड्यांवर पराभूत करत भारतीय सैनिक पराक्रम गाजवत आहेत. बेजार झालेल्या पाकची आता दुसऱ्या बाजूनेही कोंडी झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पाकच्या अत्याचारांविरुद्ध लढणाऱ्या पाकमधील बलुचिस्तान या प्रातांने या अस्थिरतेचा फायदा करून घेत स्वातंत्र्याचा नारा दिला आहे.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थक असलेल्या गटांनी पाकिस्तानी सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. क्वेटा शहरातच पाकिस्तानी सुरक्षा दलांना कमीतकमी चार मोठे हल्ले परतवून लावावे लागले आहेत. बलुचिस्तानचे लेखक मीर यार बलुच यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, बलुचांनी आपले झेंडे फडकवण्यास सुरुवात केली आहे आणि पाकिस्तानी झेंडे उतरवले जात आहेत. त्यांनी जगाला पाकिस्तानमधील दूतावास बंद करून बलुचिस्तानमध्ये उघडण्याची विनंती केली आहे. मीर म्हणाले की, “लवकरच पाकिस्तानच्या विभागणीची घोषणा होऊ शकते, कारण आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा दावा केला आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, बलुच आर्मीच्या कमीतकमी तीन गटांनी बलुचिस्तान प्रांताच्या अनेक भागांवर ताबा मिळवला आहे. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात बलुच विद्रोही इमारतींवरून पाकिस्तानचे झेंडे उतरवून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करत आपले झेंडे फडकवत आहेत. माजी पाक पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनीही कबूल केले आहे की, सरकार आणि सैन्याचे बलुचिस्तानवरील नियंत्रण सुटत आहे. बलुचिस्तानच्या समर्थकांनी जगाला मदतीसाठी आवाहन केले आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट