मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार CET

राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार CET

मुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या एका सत्रात गणित विषयातील प्रश्नांमध्ये गोंधळ झाल्याची कबुली सीईटी कक्षाने दिली आहे. आता या सत्रातील २४ हजार ७४४ विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, मराठी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये होते. त्यातील मराठी भाषेतील पेपर इंग्रजीत भाषांतरित करताना प्रश्नांच्या पर्यायांची अदलाबदल झाल्याचे स्पष्टीकरण कक्षाने दिले. संबंधित विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, यासाठी त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, असे कक्षाने सांगितले.

अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दर वर्षी पीसीएम आणि पीसीबी या दोन गटांमध्ये एमएचटी सीईटी परीक्षा होते. यातील पीसीएम गटाच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच २७ एप्रिल रोजी झालेल्या एका सत्रातील गणिताच्या पेपरमधील ५० पैकी २१ प्रश्नांसाठी दिलेल्या उत्तरांचे पर्याय चुकीचे होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, त्यात तांत्रिक चूक असल्याचे निदर्शनास आले, असे सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट