Breaking News
पुरोगामी महाराष्ट्रात उच्च शिक्षणात चाललेला सावळा गोंधळ-----
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून, अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाबाबत अतिशय निंदनीय गोष्टी घडत आहेत. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अध्यक्ष सन्मानीय अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनापर महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे प्रदान सचिव आयु. विकास रस्तोगी (IAS) यांच्या सोबत मनविसे शिष्टमंडळाने खालील अतिमहत्त्वाच्या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली.
विद्यापीठामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे, विद्यापीठाच्या आवारामध्ये शुशोभिकरण अद्यापही झालेले नाही, व्यवस्थापन परिषदेचा मनमानी कारभार, दोषी महाविद्यालयावर कोणतेही कारवाई न करता त्यांना मोकळे सोडणे, इत्यादी.
स्वायत्त महाविद्यालय चुकीचे धोरण राबवत असून शासनाच्या यंत्राचा द्वारे कुठलीच कारवाई होत नाही.
अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून क्रीडांच्या नावाने शुल्क आकारले जात आहे परंतु त्यासंदर्भात कुठलेच मार्गदर्शक, क्रीडा संचालक, क्रीडा साहित्य व जिमखाना पुरवले जात नाही.
अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये RUSA, PM-USHA द्वारे निधी मिळत असताना देखील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे व तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश न देणे.
वरील विषय अतिशय गंभीर असून यावर लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन मनविसे शिष्टमंडळाला उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडून देण्यात आले.
मनविसे शिष्टमंडळात श्री. संतोष गांगुर्डे व श्री. चेतन पेडणेकर (महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक), श्री. वैभव शिंदे (स्थानीक विभाग अध्यक्ष) यांची उपस्थितीत होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant