मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

नवी मुंबई : इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पालिका मुख्यालय ते कोकणभवन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासह नवी मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 2014 पासून तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असून या इंधन दरवाढीतून केंद्र सरकारने 25 लाख कोटी रुपयांचा कर वसूल केल्याचा आरोप शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला.

दररोज वाढत जाणारेे पेट्रोल व डिझेलचे दर आणि घरगुती गॅस दर विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आधीच कोरोनामुळे जगात आर्थिक मंदी परसली आहे. यामुळे सर्वांचेच बजेट कोलमडले आहे. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. इंधनाचे दर वाढत आहे. गॅसच्या किमंतीत वाढ होत आहे. यामुळे सामान्यांची आर्थिक परिस्थिती खालवत चालली आहे. मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. या महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई काँग्रेसने आता नागरिकांना सायकल हाच पर्याय असल्याने या सायकल रॅलीचे आयोजन केले होते. आंदोलनाला कांग्रेसतर्फे 200 पेक्षा जास्त सायकल आणण्यात आल्या होत्या. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. याप्रसंगी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. त्यांनी भाजपवर टीका करीत इंधन दर नियंत्रित करण्यात शासनाला अपयश आल्याने वाहतूक खर्चही वाढला. परिणामी महागाईत प्रचंड वाढ झाल्याचा आरोप केला. 2014 पासून तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असून या इंधन दरवाढीतून केंद्र सरकारने 25 लाख कोटी रुपयांचा कर वसूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

तर अस्लम शेख यांनी, कोरोनाकाळात नोकर्‍या गेल्या, व्यवसाय बंद झाले परिणामी बेरोजगारी वाढली. मात्र केंद्र शासनाने याची काहीही दखल घेतली नसल्याचा आरोप केला. यावेळी माजी मंत्री व प्रदेश अध्यक्ष नसीम खान, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, माजी उपमहापौर अविनाश लाड, रमाकांत म्हात्रे, वाशी अध्यक्ष सचिन नाईक व कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी कोकण भवनपर्यंत सायकलवर जाऊन कोकण आयुक्तांना महागाईचा निषेध करणारे निवेदन सुपुर्द करण्यात आले. रॅलीसाठी फक्त दहा सायकलींना परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी यापेक्षा अधिक सायकलींचा वापर करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी 35 पेक्षा अधिक सायकली जप्त केल्या. रॅलीत  सामाजिक अंतरासह अनेकांना मुखपट्टीचा वसर पडला होता. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट