मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नवी मुंबईतील बारमालकाची कर्नाटकात हत्या

हत्येप्रकरणी चौघांना अटक 

नवी मुंबई : सीबीडी येथील माया बारचा चालक-मालक वशिष्ठ यादव याची कर्नाटकातील उडपीमध्ये बेलनहल्लीजवळच्या कुक्के गावातील जंगलामध्ये हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. 

सीबीडीतील माया बारचा चालक-मालक असलेला वशिष्ठ यादव याचा मृतदेह 10 फेब्रुवारीला कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील बेलनहल्ली येथील कुक्के गावलागतच्या जंगलामध्ये आढळून आला. कर्नाटक पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले असता, त्याचा मृत्यू वायरीने गळा आवळून झाल्याचे आढळून आले. त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, सदर व्यक्ती हा नवी मुंबईतील सीबीडी परिसरातील माया बारचा चालक-मालक असल्याचे आढळून आले. त्यानुसार कर्नाटक पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे. सुमित मिश्रा (23), अब्दुल शुकूर (35), अविनाश कारकेरा (25) आणि मोहम्मद शरीफ (32) अशी त्यांची नावे आहेत. सुमित हा माया बारमध्ये आधी काम करत होता. तर इतर तिघे जण एका ट्रॅव्हल कंपनीत कामाला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित आणि वशिष्ठ यांच्यात तीन महिन्यांपूर्वी पैशांवरून भांडण झाले होते. यानंतर त्याने नोकरी सोडली होती.

सुमित याने वशिष्ठ यांना उडपी येथे आणले आणि वायरीने गळा आवळून हत्या करण्यात आली. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले होते. तपासासाठी पोलिसांचे एक पथक नेमण्यात आले होते. या पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या कारचा शोध लावत आरोपींना अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट