मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शुद्धमधासाठी बी सिटी प्रकल्प

पनवेल : औषधी असणारी शुद्ध मध शहरी भागात फारच तुरळक प्रमाणात पाहायला मिळते. मधमाशी पालन हे मुख्यत्वे ग्रामीण भागात केले जाते.  मात्र खारघर शहरात देशातील पहिला बी सीटी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाद्वारे तयार करण्यात आलेल्या मधमाशांच्या पेट्या आपल्या गच्चीवर अथवा गार्डन परिसरात लावून शुद्ध मधाची निर्मिती करता येणार आहे. 

मधाचे औषधी गुणधर्म मोठे आहे. मात्र भारतात मधमाशी पालनाचे प्रमाण खूप कमी आहे. शहरीकरणामुळे शुध्द मध मिळणेही दुर्मिळ झाले आहे. बाजारात मिळणारे मधही भेसळयुक्त असल्याने खारघर शहरातील डॉ युवराज कागीणकर यांनी, बी सिटी प्रकल्प राबविण्याची योजना आखली आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या सेक्टर 5 मधील डोंगरमाथ्याच्या परिसरात कागीणकर यांनी, मधमाशा पालनासाठी 25 पेट्या लावल्या आहेत. बी सिटी (मधमाशांचे शहर) हे संकल्पना मुख्यत्वे करून अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आदींसह मोठ्या प्रमाणात युरोपात राबविली जाते. भारतात मधमाशी पालनाबाबत जनजागृती नाही. डॉ कागीणकर यांनी याकरिता पुढाकार घेतला असून शहरातील रहिवाशी आपल्या घरी, गच्चीवर गार्डनमध्ये अशाप्रकारे मधमाशा पालन करून शुद्ध मधाचे उत्पादन करू शकतात. त्यासाठी लागणार्‍या पेटीची योग्य रित्या निगा राखल्यास महिनाभरात एका किलोच्या आसपास शुद्ध मध मिळू शकेल. शहरी भागात शुद्ध मधाच्या नावाखाली भेसळयुक्त मधाची विक्री केली जाते. त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सफरचंद, बदाम, कांद्याच्या उत्पादनात मधमाशांची भूमिका महत्त्वाची असते. संबंधीत ठिकाणी मधमाशांचा वावर नसेल तर हे उत्पादन योग्य रित्या होऊ शकणार नसल्याचे डॉ युवराज कागीणकर यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट