मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबईत ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिलपासून बंद

मुंबईत ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिलपासून बंद

मुंबई - मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरातील ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिल २०२५ पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या या मार्शलविरोधात वारंवार तक्रारी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ४ एप्रिलनंतर ‘क्लीन अप मार्शल’कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिकांनी संबंधित वॉर्ड ऑफिसशी संपर्क साधावा.

मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी महानगरपालिकेने ‘स्वच्छ मुंबई अभियान’ अंतर्गत क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली होती. शहरातील २४ प्रशासकीय विभागांमध्ये १२ संस्थांच्या माध्यमातून प्रत्येकी ३० मार्शल नियुक्त करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही काळात अनेक तक्रारी समोर आल्या. त्यामध्ये कराराच्या अटींचे पालन न करणे, अधिक दंड वसूल करणे, अनधिकृत ठिकाणी कारवाई करणे, बायोमेट्रीक हजेरीबाबत हलगर्जीपणा, असभ्य वर्तन आणि महानगरपालिकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे प्रकार समोर आले.

या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने संबंधित संस्थांचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या संस्थांना दंडही ठोठावण्यात आला आहे.

यासोबतच, ‘स्वच्छ मुंबई अभियान’ बंद होणार नसून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नव्या उपाययोजना लवकरच राबवल्या जातील, अशी माहिती उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट