मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मराठी भाषेवरील वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ

मराठी भाषेवरील वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ

मुंबई - मुंबईतील एका कार्यक्रमात मराठी भाषा बोलणे काही ठिकाणी आवश्यकच नाही अशा प्रकारच्या वक्तव्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भय्याजी जोशी वादग्रस्त ठरले असतानाच आपल्या या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला असा खुलासा त्यांनी केला तर विधिमंडळात यावरून मोठा गदारोळ झाला.

घाटकोपर मधील एका कार्यक्रमात मराठी भाषा बोलणे आलेच पाहिजे असे नाही असे वक्तव्य भय्याजी जोशी यांनी करून मराठीचा अवमान केला असा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी उपस्थित केला, त्यावरून सभागृहात सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले , हमरीतुमरी देखील झाली, विधानसभेत पाच मिनिटे कामकाज तहकूब झाले तर विधानपरिषदेत विरोधकांनी सभात्याग केला. बाहेर देखील त्याचे मोठे पडसाद उमटले, मनसे कार्यकर्त्यांनी जोशी यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन केले, राज ठाकरे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले.

राज्याची , मुंबईची आणि सरकारची भाषा मराठीच आहे असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले तर दुसरीकडे भय्याजी जोशी यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, आपल्याला आहे म्हणायचे नव्हते असा खुलासा केला आहे. मात्र यातून सरकारवर हल्लाबोल करण्याची एक चांगली संधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने विरोधकांना आयतीच दिली असे पाहायला मिळाले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट