मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जायकवाडी ९७.५० % भरले, गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु

जायकवाडी ९७.५० % भरले, गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु

छ संभाजीनगर, - मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९७.५० टक्के झाला असून आज दुपारी १ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज दुपारी १ च्या सुमारास धरणाच्या गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ व २१ असे एकूण ६ गेट ०.५ फुट उंचीने उघडून ३१४४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला. सध्या सुमारे १२,००० क्युसेक वेगाने उर्ध्व धरणातून पाण्याची आवक होत असून हा विसर्ग पाण्याची आवक पाहून कमी – जास्त केला जाईल. दर तीन तासाला आढावा घेत याबाबतीत निर्णय घेतला जाईल.

पाण्याची आवक याचं वेगाने असली तर संध्याकाळपर्यंत आणखी ६ दरवाजे उघडून ८००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढू शकतो अशी शक्यता गोदावरी पाटबंधारे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दोन, तीन दिवसांपूर्वीच दिला आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट