Breaking News
डाॅ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ञ
मुंबई ,(प्रतिनिधी )- प्रत्येकाने आपले आयुष्य सोहळ्यासारखे जगावे. तो क्षण जपावा, छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये आनंद पहावा. जोडीदारांनी एकमेकांना माणूस म्हणून बघा, आहे तसं स्वीकारा. यासाठी संवाद महत्वाचा. नातं हे फारच पवित्र आहे, प्रेम पवित्र आहे. अशा पवित्र गोष्टीला लग्नाच्या स्वरूपात एकत्र करून विवाहईच्छुकांना सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी पवित्रविवाह संस्थेतर्फे करण्यात येणारे प्रयत्न वाखणण्याजोगे आहेत. असे जाहीर उद्गार प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र बर्वे यांनी "पवित्रविवाह" मॅट्रिमनी संस्थेतर्फे नुकताच "दादर सार्वजनिक वाचनालय" येथे लग्नाबाबत "आम्ही लग्नाळू - लग्न, पँडेमिक आणि अपेक्षा" या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात केले.
आजची पिढी लग्नासंदर्भात आयडियल पार्टनरची स्वप्न पाहतात. पण यामध्ये भावनिक कमी आणि व्यावहारिक अपेक्षा जास्त असतात. या बदलत्या वातावरणात नातेवाईकांच्या साक्षीने, आशीर्वादाने पार पडणाऱ्या विवाहाच्या संस्कृती, परंपरेचा ऱ्हास होता कामा नये, असे मार्गदर्शन चर्चासत्रात विविध मान्यवरांकडून करण्यात आले . संस्थेतर्फे महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या "पँडेमिक दरम्यान लग्नाची स्थिती" या ऑनलाईन सर्व्हेक्षणातून विवाहईच्छुकांच्या लग्नाच्या निर्णयांवर झालेला परिणाम, अपेक्षा असे अनेक मुद्दे समोर आले. या सर्व्हेक्षणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने तरुण, तरुणी, कुटुंब उपस्थित होते. पत्रिका पाहणे, राशी, जोडीदाराचे स्वभाव, घटस्फोट अशा अनेक मुद्यांबाबत लग्नात स्थित्यंतरे येत आहेत. बघण्याचा कार्यक्रम ते डेटिंगपर्यंत हा प्रवास पोहोचला आहे. ''पँडेमिकचा सर्व क्षेत्रांवर प्रभाव झाला. ज्यामध्ये लग्नाचाही समावेश आहे. नोकरी कपात, कमी पगार आदी कारणांमुळे विवाहईच्छुक तरुणांवर परिणाम झाला. पण आता सर्व पूर्ववत होत आहे. तरुणांना सुयोग्य जोडीदार मिळावा या हेतूने आम्ही तुळशी विवाहाच्या शुभमुहूर्तानिमित्त "आम्ही लग्नाळू" मोहीम सुरु केली. तरुणांना मार्गदर्शन करणारे आजचे चर्चासत्र हा या मोहिमेचा शुभारंभ आहे.'' अशी माहिती "पवित्रविवाह" मॅट्रिमनीचे संचालक ऋषिकेश कदम यांनी दिली.
लग्नाशी जोडलेल्या कायदेविषयक, वैद्यकीय, कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंट या मुद्यांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी लाईफस्टाईल स्पेशालिस्ट डॉ. नेहा वैद्य, प्रमोद पवार, निमा पवार या कलाकारांसह 'माय मातृभूमी फाऊंडेशन'चे अध्यक्ष निलय वैद्य, तरुण आणि तरुणींनी भाग घेतला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar