मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘ही’ फळे चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका

रसाळ फळे  फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते. फ्रिजमध्ये आपण कोणती फळं ठेवू नये हे जाणून घेऊयात.

काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते फार काळ ताजे राहतील आणि खराब होणार नाहीत. पण तसं मुळीच नाही. मात्र सर्व फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरु शकते. फळे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे बहुतेक फळे खराब होतात किंवा आरोग्यास हानिकारक बनतात. विशेषतः रसाळ फळे  फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते. फ्रिजमध्ये आपण कोणती फळं ठेवू नये हे जाणून घेऊयात.

  • केळी
    केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातून इथिलीन गॅस सोडला जातो. ज्यामुळे फ्रिजमध्ये असलेले इतर फळे देखील लवकर पिकतात. म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये किंवा इतर फळांसोबत ठेवू नका.
  • खरबूज-टरबूज
    उन्हाळ्यात लोक खरबूज मोठ्या प्रमाणात खातात. पण हे मोठे फळ असल्याने एकाच वेळी संपवणे कठीण असते. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा लोक टरबूज, खरबूज कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवतात. जे चुकीचे आहे. टरबूज आणि खरबूज कधीही कापून फ्रिजमध्ये ठेवू नये. ही फळं फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. खाण्यापूर्वी काही वेळ ही फळं फ्रीजमध्ये ठेवता येऊ शकतात.
  • सफरचंद
    सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर पिकतं. यामागील कारण म्हणजे सफरचंदांमध्ये आढळणारी अ‍ॅक्टिव्ह एन्झाईम्स, ज्यामुळे सफरचंद वेगाने पिकते. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका. जर आपल्याला सफरचंद जास्त काळ टिकवायचे असल्यास ते कागदात लपेटून ठेवा. याशिवाय बिया असणारी फळे चेरी, पीच हे देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत.
  • आंबा 
    आंबे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. आंबे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट कमी होऊ लागतात. यामुळे आंब्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. आंबे कार्बाईडने पिकवले जातात आणि कार्बाईड पाण्यात मिसळल्यास आंबे लवकर खराब होतात.
  • लिची
    उन्हाळ्यात स्वादि
    ष्ट वाटणारं लिची फळ चुकूनही  फ्रिजमध्ये ठेवून नका. फ्रिजमध्ये लीची ठेवल्यास त्याचा वरचा भाग सारखाच राहतो, परंतु आतला भाग (पल्प) खराब होऊ लागतो. त्यामुळे फळ खाण्यायोग्यही राहत नाही. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट