मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुलीकडून आईची गळा आवळून हत्या

नवी मुंबई : आपल्या पाल्याने खूप शिकावं, मोठे व्हावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र त्यांच्यावर जबरदस्ती न करता त्यांच्या कलाने घेऊन समजावले नाही तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा प्रत्यय ऐरोलीतील दुर्घटनेतून दिसून आला आहे. अभ्यासासाठी तगादा लावणार्‍या आईची मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मुलीने दहावीत 92 टक्के गुण प्राप्त केले होते. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, अशी आई वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तिला गेल्या मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावला होता. नीट परीक्षेच्या अभ्यासामध्ये मुलीने सातत्य ठेवावे यासाठी आई मुलीवर दबाव आणत होती. त्यामुळे मुलीचे आपल्या आईसोबत अभ्यासावरुन नेहमी भांडण होत होते. या वादात मुलीने आई वडीलांविरोधात पोलिसात तक्रार करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे आईने मुलीला रबाळे पोलीस ठाण्यात नेले होते. त्यावेळी रबाळे पोलिसांनी मुलीची आणि तिच्या आई-वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवून दिले होते. त्यानंतर 30 जुलैला सकाळी या मुलीचे वडील घराबाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती, आई आणि लहान भाऊ होते. यावेळी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आईने पुन्हा आपल्या मुलीला अभ्यासावरुन रागावून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आईने हातात सुरी घेतल्याने मुलीला आईचा राग आला. त्यामुळे तीने जोरदार प्रतिकार केला. यावेळी आई आणि मुलगी या दोघींमध्ये झालेल्या झटापटीत आई खाली पडून तिच्या डोक्याला बेडरुममध्ये असलेल्या बेड लागला. त्यामुळे आई अर्धमेली होऊन पडल्यानंतर तिने बेडवर पडलेला कराटेचा कापडी बेल्ट आईच्या गळ्याभोवती घट्ट आवळला ज्यात तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे आईची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी मुलीने बेडरुमचा दरवाजा आतून बंद करुन आईच्या मोबाईल फोनवरुनच नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुलीनेच आईचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पिढीमधील अंतराचा पालकांनी विचार करावा

पिढीमधील अंतराचा पालकांनी विचार केला पाहिजे. मुलाच्या भविष्याबाबत सतर्क असताना त्यांची आवड आणि क्षमता याचा विचार केला पाहिजे. आधुनिक युगातील मुलांचे भावविश्व समजून घेऊन त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्याच्या कलेने घेतले पाहिजे. जेणेकरुन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये दुरावा निर्माण होऊन असे गुन्हेगारी कृत्य घडेल याची सर्व पालकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना दिला.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट