मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद

सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद

नवी दिल्ली -   रक्षाबंधनाचा सण निमित्ताने याच्याशी संबंधित विविध ऐतिहासिक कथा, कहाण्या सांगितल्या जातात. भावाबहिणीतील प्रेमाचा अतुट बंध दृढ करणाऱ्या या सणाला देशातील प्रत्येक प्रांतानुरुप अनेक कथा निगडीत आहेत. मात्र या हिंदू सणाचा संबंध मुस्लीम बादशहाशी जोडल्याने राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सोशल मिडियावर त्यांना ट्रोलही केलं जात आहे.

राज्यसभेच्या खासदार, लेखिका सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सणाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे की, राणी कर्णावती अडचणीत असताना तिने मुघल साम्राज्याचा राजा हुमायूला एक धागा पाठवला. अडचणीत असलेल्या बहिणीचे संरक्षण करा, असा संदेश दिने पाठवला होता. हुमायूनला हा धागा नेमका कशासाठी आहे, हे कळले नाही.

त्याला स्थानिकांनी सांगितले की, बहिणीने भावाला मदतीसाठी बोलावण्याचे हे संकेत आहेत. हुमायूला राणी कर्णावतीला वाचवणे आपले कर्तव्य असल्याची जाणीव झाली आणि तो निघाला. मात्र, त्याला पोहचण्यास विलंब झाला. तो पोहचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि आताही ही पंरपरा देशभरात पाळली जाते. म्हणून बहीण कितीही अंतरावरून भावाला राखी बांधायला जाते. यावरून सोशल मिडीयावर सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनाचा सणाचा संबंध मुघल साम्राज्याशी जोडला आहे, असा आरोप करत टीका होत आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट