मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विविध ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी

विविध ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा म्हणून अनेक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या २६ जुलै, शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या पावसाच्या पाश्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी असून पहिली ते १२वी पर्यंत सर्व माध्यमातील शाळा बंद राहणार आहेत. त्याशिवाय कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व शाळांना २६ जुलै रोजी पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्हा प्रशासनाकडून उद्या २६ जुलै रोजी शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २६ आणि २७ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना २६ जुलै शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय लोणावळ्यातही पावसाचा जोर कायम असून खबरदारी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोणावळ्यातील १२वी पर्यंत शाळा, महाविद्यालयं २५ तसंच २६ जुलै रोजी बंद राहणार आहेत.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट