मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

स्वबळ आणि राजकीय चाली

स्वबळ आणि राजकीय चाली      

                  विधानसभा निवडणूक एकत्र लढू, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा इशारा अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीला दिला आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाचे नेते अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीविषयी लक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शरद पवार राज्यात सत्तेत आल्यास मराठा आरक्षण मिळणार नाही, असे पिल्लू त्यांनी सोडले आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला आहे. पिंपरी - चिंचवड,पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घाय्याचे होते, पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही, असे म्हणत अजित पवारांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केल्याचे दिसून येते.

                आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत. महायुतीकडून सध्या पक्षांचे मेळावे घेतले जात आहे, पण या मेळाव्यातूनही ते महायुतीचेच सरकार येणार, महायुतीच जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. पुण्यात नुकतेच भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडले आहेत. पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. यावेळी,  लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.  अजित पवारांच्या मते विचार करायचा झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचे दिसून येते. असे झाले तर महायुतीचे नुकसान होणार असल्याचे दिसते. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षीय विचार होत नसेल असे मानले तर हितसंबंध जोपासून निवडणुकीचे निर्णय घेतले जातात. राज्यातील सहकाराचे जाळे लक्षात घेतले तर काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीचे पारडे जड वाटते. भाजपाने वेगळी खेळी करून निवडणुकीतील मतविभाजन केले तर महायुतीत फूट पडणार आहे. त्याचा लाभ अर्थातच भाजपाला होऊ शकतो.

              मेळाव्यात अजित पवार यांनी बोलताना पूर्वी सांगत होते, तेच सांगितले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जातात. विकासासाठी आपण निर्णय घेतला,विरोधी पक्षात राहून, आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाही. काहीजण गेले,त्यांना स्वातंत्र्य आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावे लागणार आहे, वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपण इथपर्यत पोहचलो. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात निवडून आलेले सदस्य पाहिले तर एकच आहे. भाजपाशी मैत्री करून त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद असताना पुन्हा अपयश मिळू नये, यासाठी अजितदादांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

                 अजितदादांनी म्हटले आहे की, अनेकजण पक्षात आले आहेत, त्यांचे स्वागत आहे. अंदाज आहे की, विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटपर्यंत किंवा नोव्हेंबर पहिला आठवड्यात होतील. पण हे सांगताना त्यांनी महायुतीला उद्देशून म्हटले की, लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत. मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र नसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

            सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला दिली आहे, असेही अजित पवार म्हणाले. विशाळगड येथे जे घडू नये ते घडले,कोर्टाने आदेश दिले,त्यांना आता मदत केली. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, जाती जातीमध्ये सलोखा राहिला पाहिजे, सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले. मागील दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला या निवडणुका केव्हा होणार, असा प्रश्न पडला आहे. लोकसभा निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवली. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. नुकतीच अजित पवार यांनी विधानसभा आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे महायुतीत संभ्रम होण्याची शक्यता आहे.

                पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात म्हटले आहे की, अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा. तसेच आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत, पण त्यानंतर होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अजित पवारांचा सहकार क्षेत्रात वट असला तरी आत्तेची नाडी भाजपाकडे आहे. सहकारातील जुनी प्रकरणे काढून अनेक जणांना बेजार केलेल्या भाजपाला हे आव्हान मोडून काढणे अवघड नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबत भाजपा श्रेष्ठींना अजूनही विश्वास वाटत नाही. कारण अजित दादा केव्हा कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही. असो. राजकारणातील नेत्यांचे वक्तव्य गंभीरपणे घ्यायचे नाही, असे म्हटले जाते. पण केव्हा दिलजमाई होईल तेही सांगता येत नाही. राजकारण हे अळवावरचे पाणी असते, असे म्हणतात ते खरे असावे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट