मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भाजपाचे पुण्यात महाधिवेशन , पाच हजार कार्यकर्ते सहभागी

भाजपाचे पुण्यात महाधिवेशन , पाच हजार कार्यकर्ते सहभागी

राजकीय  -    

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या रविवार, २१ रोजी होणार आहे. या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३०० पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे राज्य सरकारचा अर्थसंकल्प, राज्यातील राजकीय परिस्थिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा आलेले सरकार या विषयावर चर्चा करणार आहेत. आमदार आशिष शेलार हे सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील. पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करतील. दुपारी २ वाजता शिवप्रकाश हे संघटनात्मक कार्य, ९७ हजार बूथपर्यंतचा पुढचा कार्यक्रम या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी सुरु केलेल्या कल्याणकारी योजना याची सविस्तर मांडणी करणार आहेत.

दुपारी २.५० वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने या महाअधिवेशनाचा समारोप होणार आहे. यातून ५ हजर ३०० कार्यकर्ते हे गावागावात जाऊन राज्य सरकारची कामे घरोघरी पोहोचवतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट