मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मांसाहारास पूर्ण बंदी घालणारं जगातील पहिलं शहर

मांसाहारास पूर्ण बंदी घालणारं जगातील पहिलं शहर

भावनगर - शाकहार चांगला की मांसाहार? या विषयी मतमतांतरे दिसून येतात. अनेक वर्ष मांसाहार करणारे लोकं आरोग्य विषयक तसेच अन्य कारणास्तव मांसाहार सोडताना दिसतात. तर पिढ्यांनपिढ्या शाकाहार करणाऱ्या व्यक्ती मांसांहार स्वीकारतानाही दिसतात. शेवटी काय तर कोणत्या प्रकारचे अन्न खावे हा व्यक्तिगत प्राधान्यक्रम आहे. मात्र काही ठरावीक ठिकाणी धार्मिक कारणांस्तव मांसाहारावर बंदी असल्याचेही दिसून येते. असेच एक उदाहरण गुजरातमधील भावनगरमधील एका शहराचे आहे. हे मांसाहार बंदी असणारं जगातलं पहिलं शहर ठरलं आहे.

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातल्या पालिताना या शहरात मांसाहार खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मांसाहारास बंदी घालणारं हे जगातील पहिलं शहर आहे.पालिताना शहरात हा निर्णय जाहीर होण्याचं कारणही विशेष आहे. जवळपास 200 जैन साधूंनी सातत्यानं या विषयावर आवाज उठवल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला. जैन समाजात अहिंसा हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. या समाजातील साधूंनी शहरातील 250 कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली होती. या विषयावर त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारनं पालिताना हे शाकाहारी शहर घोषित केलं.

नॉन व्हेज खाण्यास बंदी असलेलं पालिताना हे जैन धर्मीयांच्या सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. या शहराला ‘जैन मंदिर शहर’ हे नाव देखील मिळालं आहे. शत्रूंजय पहाडाजवळ वसलेल्या या शहरात 800 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. त्यामध्ये आदिनाथ मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. या मंदिराला दरवर्षी हजारो भक्त तसंच पर्यटक भेट देतात. गुजरातमधील पालिताना शहरात मांसाहारी खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मांस पाहणे हे त्रासदायक होते. त्याचा लोकांवर विशेषत: मुलांवर नकारात्मक परिणाम होतो, असा दावा या बंदीची मागणी करणाऱ्या व्यक्तींनी केला होता.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट