मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी आता विशेष लसीकरण मोहीम

राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी आता विशेष लसीकरण मोहीम

मुंबई - राज्यातील क्षयरोगाचे निर्मूलन करून २०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता, त्यावर पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, मनिषा चौधरी, राजेश टोपे आदींनी उप प्रश्न विचारले. राज्य क्षयमुक्त २०२५ साली होऊ शकते का तसेच या रोगाचे मूळ कारण काय याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.

२०२२ साली राज्यात २, ३३,८७२ क्षय रोग रुग्ण होते तर मुंबईत ६५,४३२ क्षय रुग्ण होते, २०२४ साली राज्यात १,१०,८९६ तर मुंबईत ३०,५१९ क्षय रुग्ण आहेत अशी माहिती देखील मंत्री सावंत यांनी दिली. दाटीवाटीने असलेल्या लोकसंख्येच्या ठिकाणी या रोगाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मुंबईत देखील विशेष समिती अभ्यास करून अहवाल देईल असं सावंत यांनी सांगितलं.

आंगणवाड्या आता राज्य अर्थसंकल्पातून -

राज्यातील आंगणवाड्या उभारणी , दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मोनिका राजळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर भास्कर जाधव यांनी उप प्रश्न विचारला.

राज्यातील सर्व आंगणवाडया स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषद निधी , जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती , नवीन बांधकामे केली जातात असं तटकरे यांनी सांगितलं. 


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट