मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बोटावला चाळ रहिवासी परतीच्या वाटेवर....


गेली अठरा वर्षे आपल्या घराच्या पूनर्विकासासाठी बाहेर असलेल्या बोटावला चाळीच्या एकूण 413 रहिवासी बांधवाना आणि 10 दुकानदारांना लवकरच ताबा मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी सदर सदनिकांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात सोडत काढली जाणार असून लवकरच सर्व रहिवासी बांधव आपल्या हक्काच्या घराचा ताबा घेणार आहेत. 

2005 पासून बाहेर राहावयास असलेल्या आपल्या बांधवांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. एकूण 413 रहिवाश्यांपैकी म्हाडा संकुलात किमान 190 रहिवासी राहत होते. तर अन्यत्र संकुलात 174 रहिवासी राहत होते आणि 49 रहिवासी बांधव हे भाडेतत्वावर राहत होते. अठरा वर्षे मनस्ताप सहन करावया लागल्याने भाडेकरू अगदी मेटाकुटीस आले होते. कधी आपण आपल्या हक्काच्या घरात राहावयास जाऊ... या विवंचनेत असताना लवकरच ते परतणार असल्याने सुटकेचा निश्वास त्यांनी सोडला आहे. 

लोकांच्या मनात 'घर' हेच सर्वात मोठे समाधान. तेच घर.. आपल्या हक्काचं घर  आपल्या ताब्यात मिळणार असल्याने बोटावाला चाळीतल्या लोकांचे समाधान हेच आपल्या विभागीय जनतेचे समाधान. ताबा घेतल्यावर अनेक त्रुटी सामोर्‍या येतील. वाहनतळ, विद्युत वितरण केंद्र आदि अनेक समस्या उदभवतील परंतु बोटावाला चाळीचे कार्यकर्ते त्यावर मात करतील हा विश्वास आहे.   

स्वप्नात दडलेल्या आपल्या घराला प्रत्यक्ष डोळे भरून पाहण्यासाठी, आपले मस्तक त्या उंबरठ्यावर ठेवण्यासाठी  उत्साही असलेल्या बोटावाला चाळीच्या रहिवासी बांधवांचे स्वागत करायला घोडपदेव समूहातील प्रत्येकजन  उतावीळ झाला आहे.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट