मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भावबंध कोकणचे : मालवणी भावभावनांचो कोलाज

       कवितांच्या रंगभूमीवरच्या अनोख्या नाट्याविष्काराला रसिकांची दाद

        कणकवली (गुरुदत्त वाकदेकर) : मालवणी बोलीत असलेली आभाळाला आणि काळजाला साद घालण्याची ताकद ज्यावेळी रंगमंचावर सादर होते त्यावेळी त्यातला प्रगल्भपणा हा खऱ्या अर्थाने देहाला आणि मनाला संपृक्त करतो. रंगमंचावर नव्याने दाखल झालेली 'भावबंध कोकणचे' ही कलाकृती त्याचाच उत्कट प्रत्यय आहे.

         'भावबंध कोकणचे' या डॉ. सई लळीत यांच्या कवितांच्या नाट्याविष्कार कार्यक्रमात वांगड, लास्टो पावस्, शबय, सोरगत, चाकरमानी अशा कवितांमधील भावबंध अनुभवताना रसिकांचे डोळे पाणावले. कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेने निर्मिती केलेल्या 'भावबंध कोकणचे' या डॉ. सई लळीत यांच्या कवितांच्या नाट्याविष्कार कार्यक्रमाची संकल्पनाच अफाट आहे. या कार्यक्रमाचे काव्यलेखन, संहितालेखन, निवेदन आणि दिग्दर्शन डॉ. सई लळीत यांनी केले. रंगमंचावर एका बाजुला त्या स्वत:च्या मालवणी कवितांचे अभिवाचन करीत असताना त्याचवेळी कलाकारांनी त्या कवितांचा आशय अभिनयाद्वारे रंगमंचावर सादर केला. एकाचवेळी कवितांचे वाचन आणि त्यांचा रंगमंचीय आविष्कार होत असताना पडद्यावर अनुरुप छायाचित्रांचे दर्शनही घडविण्यात येत होते.कवितांच्या या दृश्य आविष्काराचा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांनी उचलून घेतला व प्रत्येक सादरीकरणाच्या शेवटी टाळ्यांच्या प्रचंड प्रतिसादात दाद मिळत होती.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला  'चाकरमानी' ही कविता सादर झाली. चाकरमान्याच्या प्रतिक्षेत असणारी त्याची बहीण, आईवडील यांची तो येण्याची उत्सुकता आणि मुंबईला परतताना होणारी घालमेल याचे उत्कृष्ट दर्शन या कवितेतून घडविण्यात आले. निलेश पवार, अभय खडपकर, सुप्रिया प्रभुमिराशी, अदिती लळीत, सत्यवान गावकर यांनी ही कविता अभिनित केली. यानंतर सोरगत (मंगल राणे), बाशिंगबळ (श्रेयश शिंदे, प्रियांका मुसळे), हंड्रेड पर्सेन्ट (मंगल राणे, निलेश पवार), आज घरवाले येतले (श्रीया शिंदे), मऊसा चान्ना पडांदे (प्रियांका मुसळे), चालता हो (निलेश पवार, मंगल राणे), हाली ना माका हेंची खुप दया येता (कांचन खानोलकर, अभय खडपकर) या कविता सादर झाल्या आणि हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. दशावतारी नाटकातील राक्षसपार्टी सादर करणाऱ्या कलावंताचे मनोगत व्यक्त करणारी व राजकारणातील सद्यस्थितीचे भेसूर दर्शन घडवणारी 'गोडो राक्षस' ही कविता शरद सावंत यांनी राक्षसाच्या वेशभुषेत अप्रतिमपणे सादर केली. मी केवळ राक्षसाचे काम करणारा एक साधासुधा नट आहे, खरे भेसुर राक्षस समाजात कसे वावरत आहेत, याचे दर्शन घडविणारी ही कविता प्रेक्षकांना अंर्तमुख करुन गेली. 'शबय' या अतिशय तरल कवितेमधुन शिमग्यातील 'राधा' बनून मुद्दामच आपल्या प्रेयसीच्या (आता विवाहीत) दारात येणारा प्रियकर राकेश काणेकर या उमद्या कलाकाराने रंगवला. त्याने 'राधे'च्या स्त्रीवेशात सादर केलेली ही कविता प्रेक्षकांनी उचलून घेतली.

              मुंबईत रमलेल्या व आताशा गावी न येणाऱ्या आपल्या मुलाची वाट पाहणारी, त्यानेच दहा वर्षांपुर्वी दिलेल्या स्वेटरच्या 'वांगडा'ने मुलखात एकटी दिवस कंठणारी एकाकी वृद्ध आई सुप्रिया प्रभुमिराशी यांनी समर्थपणे साकारली. तिचा एकाकीपणा, विवशता आणि दु:ख पाहून रसिक हेलावले. आयुष्याच्या उतारावर असलेला आणि यंदाचा पाऊस हा कदाचित शेवटचा असेल का, असा विचार करणारा वृद्ध अभय खडपकर यांनी 'लास्टो पावस्' या कवितेद्वारे कसदार अभिनयाने प्रत्यक्ष साकारला. हा पाऊस जर शेवटचाच असेल ती नवी छत्री घेऊ की नको, असे म्हणतानाची त्याची घालमेल रसिकांना अस्वस्थ करुन गेली. 

           सत्यवान गावकर याने साकारलेला आणि प्रत्येक गावात दिसणारा 'बाबी' रसिकांच्या पसंतीला उतरला. गावातील प्रत्येकाला अडीनडीच्या प्रसंगी जमेल तशी मदत करणाऱ्या मालवणी कॉमन मॅन 'बाबी'ची भुमिका त्याने जिवंत केली. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन, निर्मिती आणि छायाचित्रांचे सादरीकरण सतीश लळीत यांनी केले. पखवाजाची साथ अनीश ठाकुर याने दिली. राकेश काणेकर यांची वेशभूषा प्रशांत ठाकूर आणि भाग्यश्री मांजरेकर यांनी, तर राक्षसाची रंगभुषा दशावतारी कलावंत नारायण आईर यांनी केली. ध्वनीयंत्रणा डंबे बंधु यांनी, तर प्रकाशयोजना हृषिकेश कोरडे यांनी सांभाळली.  मालवणी बोलीत मूलतः एक काव्यमयता आहे, इथल्या बोलीतल्या सुरात जशी जाणवते तशीच ती सहज साध्या संवादातही जाणवत राहते. डॉ. सई लळीत यांनी 'भावबंध कोकणचे' या काव्यात्मक नाट्याविष्कार माध्यमातून बोलीतला हा सशक्त प्रकार रंगमंचावर आणण्याचे धाडस केले आहे, त्यासाठी रसिकांनी त्यांचे कौतुक केले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट