Breaking News
राज्यात कोरोनाची वाढणारी संख्या, आणि सोबतीला ओमायक्रॉनचा चा चढता आलेख या सगळ्याच गोष्टीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येत असल्याचे संकेत राज्यसरकार कडून मिळत आहेत. याच पार्श्वभूमी वर महाराष्ट्रामधील नाशिक मध्ये नो एंट्री पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
राज्यात रूग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढत आहे. गेल्या 35 दिवसांनंतर पहिल्यांदाच रूग्णसंख्या एक हजारहून अधिक झाली. काल दिवसभरात मुंबईत 490 जणांसह राज्यात 1201 कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, नाशिकमध्येही कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे नाशिक शहरात आजपासून नो व्हॅक्सिन नो एंट्री नियम लागू करण्यात आला आहे. हि अनोखी मोहीम नाशिक मध्ये आज पासून राबवण्यात येणार आहे, ज्यामध्ये हॉटेल, पर्यटनस्थळ, एसटी, रेल्वे, यांसारख्या गजबजणाऱ्या सगळ्या ठिकाणांवर रोख लावण्यात आली आहे. लसीकरणाचे दोन डोस झाले असतील तरच नाशिक मध्ये आणि नाशिक मधील इतर भागांमध्ये फिरण्याची मुभा नागरिकांना मिळणार आहे. आणि जे नागरिक या नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नाशिक महानगर पालिकेकडून मिळाले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant