मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रामदास कदम पक्ष सोडणार का ?

       सध्या महाराष्ट्रमधील राजकीय घडामोडीना एक वेगळंच उधाण आलं आहे. आणि याच मुख्य कारण म्हणजे शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांची नाराजी आणि त्यांचा या नाराजी नंतर होणार निर्णय, माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदासजी कदम हे पक्षातल्या आतील राजकारणामुळे शिवसेनेला राम राम करणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. फडणवीस सरकार असताना कदम यांच्याकडे मंत्रीपद होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र, त्यांना मंत्रीपदासाठी डावलण्यात आलं. 

       भाजप मंत्री किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यां विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चाला खतपाणी घालायचं काम रामदास कदम यांनी केले होते असा आरोप त्यांच्या वर होता. आणि याच आरोपांसोबत रामदास कदम न्यांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा बाहेर आली होती, ज्यामध्ये अनिल परब यांना अटक झाल्याचा आनंद व्यक्त करताना ऐकायला येते. परत रामदास कदम यांनी हि ऑडिओ क्लिप त्यांची नसल्याची सांगून सगळे दावे फेटाळले आहेत. आणि याच साऱ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या पक्ष पदावर सुद्धा दिसून येत आहे. अलीकडे झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमधून सुद्धा त्यांना डावळण्यात आलं, इतकंच न्हवे तर  दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 निमित्त आज दापोली येथील केळसकर नाका येथे शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीची जाहीर प्रचार सभा आज आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेच्या स्टेजवर लावलेल्या बॅनर वरून शिवसेनेचे नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा फोटो डावळण्यात आला होता. यासगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत, रामदास कदम आता काय निर्णय घेतील याकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट