मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी पवित्रविवाह संस्थेचे प्रयत्न वाखाणण्याजोगे

डाॅ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ञ

 मुंबई ,(प्रतिनिधी )- प्रत्येकाने आपले आयुष्य सोहळ्यासारखे जगावे. तो क्षण जपावा, छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये आनंद पहावा. जोडीदारांनी एकमेकांना माणूस म्हणून बघा, आहे तसं स्वीकारा. यासाठी संवाद महत्वाचा. नातं हे फारच पवित्र आहे, प्रेम पवित्र आहे. अशा पवित्र गोष्टीला लग्नाच्या स्वरूपात एकत्र करून विवाहईच्छुकांना सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी पवित्रविवाह संस्थेतर्फे करण्यात येणारे प्रयत्न वाखणण्याजोगे आहेत. असे जाहीर उद्गार प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ  डाॅ. राजेंद्र बर्वे यांनी  "पवित्रविवाह" मॅट्रिमनी संस्थेतर्फे  नुकताच "दादर सार्वजनिक वाचनालय" येथे लग्नाबाबत  "आम्ही लग्नाळू - लग्न, पँडेमिक आणि अपेक्षा" या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात केले.

आजची पिढी लग्नासंदर्भात आयडियल पार्टनरची  स्वप्न पाहतात. पण यामध्ये भावनिक कमी आणि व्यावहारिक अपेक्षा जास्त असतात. या बदलत्या वातावरणात नातेवाईकांच्या साक्षीने, आशीर्वादाने पार पडणाऱ्या विवाहाच्या संस्कृती,  परंपरेचा ऱ्हास होता कामा नये, असे मार्गदर्शन चर्चासत्रात विविध मान्यवरांकडून  करण्यात आले . संस्थेतर्फे महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या "पँडेमिक दरम्यान लग्नाची स्थिती" या ऑनलाईन सर्व्हेक्षणातून विवाहईच्छुकांच्या लग्नाच्या निर्णयांवर झालेला परिणाम, अपेक्षा असे अनेक मुद्दे समोर आले. या सर्व्हेक्षणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी मोठ्या संख्येने तरुण, तरुणी, कुटुंब उपस्थित होते. पत्रिका पाहणे, राशी, जोडीदाराचे स्वभाव, घटस्फोट अशा अनेक मुद्यांबाबत लग्नात स्थित्यंतरे येत आहेत. बघण्याचा कार्यक्रम ते डेटिंगपर्यंत हा प्रवास पोहोचला आहे. ''पँडेमिकचा सर्व क्षेत्रांवर प्रभाव झाला. ज्यामध्ये लग्नाचाही समावेश आहे. नोकरी कपात, कमी पगार आदी कारणांमुळे विवाहईच्छुक तरुणांवर परिणाम झाला. पण आता सर्व पूर्ववत होत आहे. तरुणांना सुयोग्य जोडीदार मिळावा या हेतूने आम्ही तुळशी विवाहाच्या शुभमुहूर्तानिमित्त "आम्ही लग्नाळू" मोहीम सुरु केली. तरुणांना मार्गदर्शन करणारे आजचे चर्चासत्र हा या मोहिमेचा शुभारंभ आहे.'' अशी माहिती "पवित्रविवाह" मॅट्रिमनीचे संचालक ऋषिकेश कदम यांनी दिली. 

लग्नाशी जोडलेल्या कायदेविषयक, वैद्यकीय, कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंट या मुद्यांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी लाईफस्टाईल स्पेशालिस्ट डॉ. नेहा वैद्य, प्रमोद पवार, निमा पवार या कलाकारांसह 'माय मातृभूमी फाऊंडेशन'चे अध्यक्ष निलय वैद्य, तरुण आणि तरुणींनी भाग घेतला होता.

रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट