मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

प्रत्यक्षात कत्तल ५५०पेक्षा जास्त झाडांची? यंत्रणेकडून चुकीचे आकडे दिल्याचा आरोप

प्रत्यक्षात कत्तल ५५०पेक्षा जास्त झाडांची? यंत्रणेकडून चुकीचे आकडे दिल्याचा आरोप

मुंबई -पैठण रोडसह शहर परिसरातील इतर अनेक रस्त्यांवरची शेकडो झाडे काही वर्षांत तोडल्यानंतर आता नगर नाका ते दौलताबाद रस्त्यावरचे जुने वृक्ष तोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची संख्या साडेतीनशे असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात साडेपाचशेपेक्षा जास्त झाडे असू शकतात, अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही झाडे कुठल्याही परिस्थितीत न तोडता बाजूने रस्ता तयार करण्यात यावा किंवा इतर पर्यायांचा विचार करावा, अशीही पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.

या रस्त्यावर वेगवेगळ्या झाडांची दुतर्फा दाट सावली व वैभव आहेच; शिवाय २५ प्रकारच्या अस्सल देशी झाडांचे अस्तित्व या रस्त्यावर वर्षानुवर्षे टिकून आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर साडेतीनशे झाडे असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जात असले; तरी प्रत्यक्षात सर्व झाडांची संख्या साडेपाचशेपेक्षा जास्त असू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर वडाचे ७१ वृक्ष, कडुलिंबाचे २२५ वृक्ष, शिसमचे ५० वृक्ष, महारुख ४०, तर काशिदचे ४० वृक्ष आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे ही झाडे तोडली तर या रस्त्यावरील संपूर्ण देशी वृक्षसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरे म्हणजे इतर अनेक पर्यायांचा विचार करण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. या विषयी पर्यावरणप्रेमी कमल पहाडे म्हणाले, ‘नाशिक परिसरात अशी कितीतरी शेकडो जुनी झाडे वाचवून बाजुने रस्ते तयार करण्यात आले आहेत. यामुळे काही प्रमाणात खर्च वाढू शकतो; परंतु अस्सल देशी वनसंपदा वाचवली जाऊ शकते.’


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट