मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विधानपरिषद निवडणूकीत महायुतीच सरस

विधानपरिषद निवडणूकीत महायुतीच सरस

मुंबई - राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीच्या ९ तर महाविकास आघाडीच्या २ उमेदवारांनी विजय मिळवला तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला यामुळे दोन वर्षांपूर्वी महायुतीने मिळवलेला विजय यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या एकत्रित योजनेचा परिणाम ठरला आहे.

आज झालेल्या मतदानात विधानसभेच्या एकूण २७४ आमदारांनी मतदान केले. महायुतीच्या वतीने उभे असणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे , परिणय फुके , योगेश टिळेकर आणि अमित गोरखे हे चार उमेदवार पहिल्या पसंतीच्या २६ मतांचा कोटा पूर्ण करून विजयी झाले. तर भाजपाचे पाचवे उमेदवार सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीची २३ मतं घेऊन विजयी झाले.

शिवसेनेकडून भावना गवळी यांनी पहिल्या पसंतीची २४ आणि कृपाल तुमाने यांनी २५ मतं मिळवत विजय मिळवला.

राष्ट्रवादी काँग्रेवसचे राजेश विटेकर २३ आणि शिवाजीरावर गर्जे पहिल्या पसंती क्रमाची २४ मतं घेऊन विजयी झाले.

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्यासाठी २५ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता,पहिल्या पसंतीक्रमातच हा कोटा पूर्ण करत त्या विजयी झाल्या. शेवटी झालेल्या चुरशीच्या लढतीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली. मिलिंद नार्वेकर दुसऱ्या पसंतीक्रमाची २२ मत मिळवत विजयी झाले. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित जयंत पाटील यांना केवळ १२ मतं मिळाली . गेली अनेक वर्षे शेकापचं विधानसभेत कमी संख्याबळ असूनही जयंत पाटील विधानपरिषदेवर निवडून येत होते. यावेळी मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षातील मतं त्यांना मिळाली नाहीत त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

यामुळे अजित पवार गटात नाराज असणारे आमदार फुटतील , भाजपच्या एका उमेदवाराचा पराभव होऊ शकतो अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा आहे. गेल्या वेळी देखील काँग्रेसची मते फुटली होती. या वेळी एक मत बाद म्हणजे अवैध ठरले आहे, ते कोणाचे यावर मात्र चर्चा रंगली आहे.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट