मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पेपरफुटी प्रतिबंधक कायदा याच अधिवेशनात

पेपरफुटी प्रतिबंधक कायदा याच अधिवेशनात  

मुंबई — राज्यात एक लाखांहून अधिक तरुणांना कोणतीही अडचण न येता गेल्या दोन वर्षांत नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, एखादा अपवाद वगळता ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तरीही पेपरफुटी संदर्भातील कायदा याच अधिवेशनात आणला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पेपर फुटीचे फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्या वेबसाईट वर गुन्हा दाखल केला जाईल असं ते म्हणाले. याबाबतचा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता. राजेश टोपे, आशिष शेलार , रोहित पवार , भास्कर जाधव आदींनी उप प्रश्न विचारले.

तलाठी भरती प्रक्रियेत कोणताही गोंधळ नव्हता तरी गदारोळ झाल्यानं ती प्रक्रिया नव्याने करत आहोत , पेपरफुटी चे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावरील कर्मचारी आयत्या वेळी ठरविले जातील आणि त्यांच्यावरील निरीक्षक नेमण्यात येतील असं ही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सरकारनं ७५ हजार पद भरती करण्याचं जाहीर केलं होतं प्रत्यक्षात आजवर ५७,४५२ जणांना नियुक्त्या दिल्या आहेत. १९,८५३ जणांच्या परीक्षा पूर्ण होऊन निकाल लागले आहेत. त्यांना लवकरच नियुक्ती दिली जाईल अशा एकूण ७७,३०५ नोकऱ्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत दिल्या आहेत, हा देश पातळीवरचा विक्रम आहे. आणखी ३१, २०१ पद भरती ची कारवाई सुरू आहे. याशिवाय गट क वर्गाच्या जागा आता mpsc मार्फत भरल्या जातील अशी माहिती फडणवीस यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट