मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर

टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! साऊथ अफ्रिकेचा पराभव करून उचलली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी

South Africa Win T20 World Cup 2024 : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या 76 धावा आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 176 धावा केल्या होत्या. तर साऊथ अफ्रिकाकडून हेन्रिक क्लासेनने 52 धावांची वादळी खेळी केली.

टीम इंडियाने दिलेल्या 177 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेची सुरूवात देखील खराब झाली. पहिल्या दोन ओव्हरमध्ये रीझा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्कराम स्वस्तात परतले. त्यानंतर मात्र, क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सने डाव सांभाळला अन् टीम इंडियाला बॅक फूटवर पाठवलं. तर स्टब्ल बाद झाल्यानंतर आलेल्या हेन्रिक क्लासेनने मैदानात वादळ उठवलं. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना चोप दिला. अखेर हार्दिक पांड्याने क्लासेनचं वादळ शांत केलं. अखेरच्या ओव्हरमध्ये साऊथ अफ्रिकेला 16 धावांची गरज होती. 

टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या रोहित आणि विराटने पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरूवात करून दिली खरी पण नंतर साऊथ अफ्रिकेच्या केशव महाराजने टीम इंडियाला दोन धक्के दिले. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत एकामागोमाग बाद झाले. सूर्या देखील लगेच तंबूत परतल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला. तर विराट कोहलीने एक बाजू राखून धरली. अक्षरने काही खराब बॉलवर दांडपट्टा चालवला. तर विराटने धावसंख्या चालवली. विराट कोहलीने 59 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर अक्षरने 31 बॉलमध्ये 47 धावा कुटल्या. अक्षर धावबाद झाल्यानंतर शिवम दुबेने काही आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने टीम इंडियाला 176 धावांवर पोहोचवलं.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट