मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

१५ जुलैपर्यंत राज्यातील अवकाळीची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय

१५ जुलैपर्यंत राज्यातील अवकाळीची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय 

मुंबई : राज्यात यावर्षी जानेवारी ते मे महिन्या दरम्यान झालेल्या अवेळी पावसामुळे २,९१,४३३ हेक्टर जमिनींवरील पिकांचं नुकसान झालं असून राज्य सरकारने यासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वितरण येत्या १५ जुलै पर्यंत करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

१७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आधी ४९५ कोटींच्या नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे आले होते, मात्र त्यात आणखी ९ जिल्ह्यांचे नुकसान झाल्याचे आढळून आले त्यामुळे ते एकत्रित करून परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडे NDVI निकषानुसार आहेत का हे तपासून पाहण्यासाठी पाठवले आहेत.

त्यानंतर ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांच्याकडून ज्या रकमेचे अहवाल येतील त्याला मान्यता देऊन त्याचं वितरण केलं जाईल अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. याआधी आजवर केवळ २४ कोटींची भरपाई दिली गेली असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. बाळासाहेब थोरात , नितीन राऊत आदींनी उपप्रश्र्न विचारले.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट