मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अर्थमंत्र्यांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा

आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अर्थमंत्र्यांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Budget Session 2024 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2024) आज दुसरा दिवस असून अर्थमंत्री अजित पवार  यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प  मांडला. विधानसभा निवडणुका  अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवारांनी केली आहे. याअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

'बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल', हा अभंग म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 सालचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली. त्यांनी पहिली महत्वाची घोषणा वारकर्‍यांसाठी केली.  प्रती दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देणार आहे. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे. वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. 


मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा 

गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे अक्षरशः बेजार झाले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेल, CNG तसेच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सिलेंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणाला ही योजना सहाय्यभूत ठरेल. 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले. 

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट