मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हायकल लिमिटेड मधील कामगारांचे आक्रोश आंदोलन.

महाड औद्योगिक क्षेत्रामधील हायकल लिमिटेड या उद्योगातील कामगार आक्रोश आंदोलनच्या तयारीत आहेत. कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने हे आक्रोश आंदोलन पुकारले असून हायकल व्यवस्थापनाकडे महासंघाने बोनस च्या संदर्भात केलेल्या मागणीवर हायकल व्यवस्थापनाने कुठलाही प्रतिसाद न देता उलट हटवाद जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. 


कोविड १९ च्या महामारीमध्ये कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कंपनीच्या उत्पादनात खंड पडू दिला नाही. कंपनीला करोडो रुपयांचा फायदा करून दिला. महाड मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन महाड मधील अनेक कारखाने बाधित झाले. हायकल लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. त्यांची वित्तहानी झाली. काही कारखान्यांनी त्यांच्या कामगारांना मदत केली, पण हायकल लि. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना वाऱ्यावर सोडल्यामुळे काहीच मदत झाली नाही. 

प्लॅन्ट मध्ये होणाऱ्या प्रदुषणाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करून कामगारांच्या  मानसिक, शारीरिक छळाबरोबरच कामगारांच्या आरोग्याची सुध्दा हेळसांड होत आहे. व्यवस्थापनाच्या ठराविक वरिष्ठ अधिकाऱ्यांची कामगारांच्या बाबतीत नकारात्मक वागणूक आहे. कंपनी व्यवस्थापनाला कामगारांचे कुठलेही प्रश्न सोडवण्याची अजिबात ईच्छा नसल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाल्यामुळे कंपनी मध्ये अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे. कंपनी ला करोडो रुपयांचा फायदा होवूनही दिवाळी जवळ असूनही बोनस च्या संदर्भात कुठलीही चर्चा नसल्यामुळे असंतोष पसरलेला आहे. २२ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत कंपनीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर कामगार आक्रोश आंदोलनाच्या तयारीत आहेत. यामुळे बोनस संदर्भात मार्ग निघालाच पाहिजे, नाहीतर उद्द्भवणाऱ्या परिस्थितीला व्यवसथापन जबाबदार राहील, असा इशारा कामगारांनी दिलेला आहे.

लेखक:-राजेंद्र साळसकर

भ्रमणध्वनी क्र.९३२३१८४१४२

रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट