Breaking News
नवी मुंबई ः दिघा आणि तुर्भे येथील या दोन पक्षांच्या महत्त्वाच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागातील भाजपाची ताकद वाढली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. भाजपात आलेल्या सर्वांना आपुलकीची वागणूक मिळेल. जनतेचे हित साधण्यासाठी महापालिकेची सत्ता प्राप्त करूया असे मार्गदर्शन नाईक यांनी यावेळी केले.
आमदार गणेश नाईक, भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. गेली वीस वर्षे शिवसेनेमध्ये कार्यरत दिघा येथील शिवसेनेचे विभागप्रमुख सुभाष काळे गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे काम करणारे शाखाप्रमुख केशव चव्हाण, दिघा येथील शिवसेना युवा विभाग अधिकारी सचिन लोंढे, समाजसेविका श्वेता काळे, जय लहुजी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजासाठी महाराष्ट्रभर काम करणारे योगेश शिंदे, असंघटित कामगारांच्या हितासाठी काम करणारे राष्ट्रवादीचे तुर्भे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे, माजी नगरसेवक प्रल्हाद शेलटकर शाखाप्रमुख बसवराज गडीवडार शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मल्लेश पुजारी, राष्ट्रवादीचे तुर्भे तालुका उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, तुर्भे तालुका कार्याध्यक्ष नियाज शेख या सर्वांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. आमदार गणेश नाईक यांनी प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले. नवी मुंबई महापालिकेतील सत्तेचा लोककल्याणासाठी वापर केला असे सांगून लोकनेते आमदार नाईक यांनी गुंडांना घाबरू नका. आपल्याकडे असलेले नैतिकतेचे शस्त्र सर्वात मोठे आहे, असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. लोकनेते नाईक म्हणाले, भाजपात आलेल्या सर्वांना आपुलकीची वागणूक मिळेल. पालिका निवडणुकांच्या दृष्टीने सावध रहा असा सल्लाही नाईकंानी यावेळी दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya