मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नवी मुंबई मनसेचे राज्य सरकारविरुद्ध आंदोलन

एमपीएससी विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी मनसे आक्रमक ; आंदोलनकर्ते ताब्यात 

नवी मुंबई ः एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. स्वप्निलच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नवी मुंबई मनसेने सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून 5 जुलैला नवी मुंबई ते विधानभवन धडक मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र पोलीसांनी वाशीत मोर्चेकरांना अडवून ताब्यात घेतले. अधिवेशनात एपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेतला नाही तर मनसेचे कार्यकर्ते विधानभवनात घुसतील असा इशारा यावेळी देण्यात आला. 

2019 आणि 2020 मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊनही भरती प्रक्रिया सुरु न झाल्याने स्वप्निल हताश होता. गरीब वडिलांनी सावकारी कर्ज काढून शिकवल्याने स्वप्निल कर्ज कसे फिटेल या विवंचनेत होता. यातून निराश होऊन स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. महाराष्ट्र राज्य सरकारच्या दिरंगाईमुळेच स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याने मनसेचे संवेदनशील नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारविरुद्ध सोमवारी मनसेने नवी मुंबईतून आंदोलनाची हाक दिली. मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकारी / कार्यकर्त्यांनी नवी मुंबई ते विधानभवन असा मोर्चा काढला. सकाळी 7 वाजता वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. परंतु वाशी पोलिसांनी रस्त्यातच मोर्चा अडवून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. ‘स्वप्निलला न्याय मिळालाच पाहिजे, सरकारवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या सरकारच करायचं काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देऊन महाराष्ट्र सैनिकांनी वाशी परिसर दणाणून सोडला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

आत्महत्या होऊन अनेक दिवस झाले तरीही सरकारला जाग येत नाही. स्वप्निल सारख्या हजारो-लाखो तरुण आज नैराश्येत आहेत. केवळ सरकारच्या दिरंगाईमुळे हे झाल्याने सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली. सरकारमधील आदित्य ठाकरे, रोहित पवार हे युवा नेते का शांत आहेत असाही सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला. येत्या दोन दिवसात अधिवेशनात सरकारने एपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेतला नाही तर मनसेचे कार्यकर्ते विधानभवनात घुसतील असा इशारा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सरकारला दिला.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट