Breaking News
मुंबई : राज्यात अनलॉक वरुन दोन दिवस सुरु असलेल्या चर्चांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी मध्यरात्री राज्य शासनाने अनलॉक संदर्भातील नियमावली जारी करुन हा संभ्रम दूर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला.
राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री ही नवी नियमावली जारी केली. पाच टप्प्यांत हे अनलॉक होणार आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (ग्रामीण- मुंबई वगळता) या नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
5 टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्ही 10 ते 20 टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा टप्पा मानला जाईल आणि तेथे सायंकाळी 5 नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा टप्पा असेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya