मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात होणार ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा

22 निकषांवर गुणांकन; प्रथम क्रमांकास 50 लाखांचे बक्षिस

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50  लाख, 25 लाख आणि 15 लाख  असे 3 विभागवार पुरस्काराची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. 

जगभर थैमान घातलेल्या कोरोना संक्रमणला अटकाव घालण्यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. आपले गाव कोरोनामुक्त केले तर तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे गावागावांमध्ये कोरोना मुक्तीसाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे  व त्यासाठी स्पर्धा ठेवणे, त्यांचा गौरव करणे व विकासकामांच्या निधीमधून जादाचा निधी दिला तर जास्त प्रभाव पडेल. या हेतुने कोरोना मुक्त गाव पुरस्कार योजना राबविण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायतीच्या स्तरावर वेगवेगळ्या 5 पथकांची स्थापना करुन त्यांनी दिलेले कार्य करणे गरजेचे आहे. त्यांनी दिलेल्या निकषांनुसार गुणांकन करणे व ग्रामपंचायतीने स्वयंमुल्याकन संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. 

कोरोना मुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. 6 महसुली विभागात प्रत्येकी  3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षिसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षिसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच करोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • पाच पथकांमध्ये कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करुन कार्य करणे, कोरोना तपासणीसाठी व रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणार्‍या वाहन चालकांचे पथक, कोव्हिड हेल्पलाईन पथक, कोविड-19 लसीकरण पथकांचा समावेश असेल. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट