मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘आदर्श भाडेकरु कायद्या’ला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली ः रिकामी घरे ही लोकांना भाडेतत्वावर उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकारने ‘मॉडेल टेनन्सी अ‍ॅक्ट’ अर्थात ‘आदर्श भाडेकरु कायद्या’ला मंजुरी दिली आहे. या नियमानुसार घर मालकांना आता दोन महिन्यांपेक्षा जास्त रक्कम अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येणार नाही. या कायद्यामुळे घरमालक आणि भाडेकरु या दोघांच्याही मनमानीला चाप बसणार आहे. 

हा कायदा बुधवारी (2 जून) पारित झाला असून या कायद्याची अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. आदर्श भाडेकरु कायद्यातील स्पष्ट नियमांमुळे भाडेकरु आणि मालकांच्या व्यवहारात एक पारदर्शकता येण्याची शक्यत्ता आहे.  कायदा आदर्श कायदा असल्याने त्यानुसार आपल्या कायद्यांत बदल करावा, असे केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे.

भाडेकरूंचे हक्क
आदर्श घरभाडे  कायद्यानुसार, घरमालकांना  कोणत्याही उद्देशाने  घराकडे जायचे असल्यास त्याने 24 तास अगोदर लेखी नोटीस द्यायची आहे.  भाडे करारामध्ये  लिखित मुदतीपूर्वी घरमालकाला भाडेकरूला  घराबाहेर काढता येणार नाही.   मात्र जर  भाडेकरुणे  सलग दोन महिन्यांपर्यंत  भाडे दिलं नसेल किंवा तो मालमत्तेचा गैरवापर करीत असेल.  तर व्यावसायिक मालमत्ता म्हणून जास्तीत जास्त 6 महिन्यांची सुरक्षा ठेव स्वरूपात घेण्यास मंजूरी देण्यात आली आहे. 
या कायद्यानसार घरमालकांचे हक्क 
भाडेकरारानुसार मुदत संपल्या नंतरही जर भाडेकरू घर सोडण्यास तयार नसेल तर घरमालकाला ठरलेल्या मासिक भाड्यापेक्षा चौपट भाडे  मागण्याचा अधिकार आहे.  तसेच भाडेकरारानुसार,  भाडेकरुला मुदतीच्या आत घर किंवा दुकान रिकामे करत नसेल तर  पुढील दोन महीने  मालक दुप्पट भाडे आकारू शकतो. आणि दोन महिन्यांनंतरही भाडेकरू घर किंवा दुकान खाली करत नसेल तर घरमालकाला  चारपट भाडं वसूल करण्याचा अधिकार या कायद्यात देणायत आला आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट