मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना ‘निसर्ग’प्रमाणेच भरपाई

मुख्यमंत्र्यांची घोषणा; कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही

मुंबई : गत वर्षीं आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाचे तसेच नागरिकांचे अतोनात नुकसान केले होते. त्यातून नागरिक सावरले न सावरले तोच तौक्तेचा जोरदार फटका बसला. त्यामुळे किनारपट्टीजवळ असलेल्या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तौत्के चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर तौत्के चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिला. या तडाख्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यासह राज्यातील सागरी किनार्‍यावरील हजारो नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्र्यांकडून मंगळवारी सांगण्यात आलं. 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा केला होता. त्या दौर्‍यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. दौर्‍यावेळी तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल. कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी आज घोषणा केली. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट