मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात चक्रीवादळामुळे 46 लाख ग्राहकांवर परिणाम

युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा केला सुरळित ; अधिकारी, तंत्रज्ञांचे ऊर्जामंत्री यांनी केले कौतुक

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील 10752 गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 6040 गावातील वीजपुरवठा सोमवार संध्याकाळ पर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

राज्यात शेकडो पोल पडले, तारा तुटल्या व जोरदार वारा व मुसळाधार पावसाने फिडर ट्रिप झाले. अंधार्‍या रात्री तिमिराची तमा न बाळगता व रात्रभर जागून नागरिकांना सेवा दिली तसेच आताही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरण कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर अविरत काम करून चक्रीवादळामुळे अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला. या कामात स्थानिकांनी गावकर्‍यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांना खूप सहकार्य केले. त्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 85 हजार 519  ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर सोमवार संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. या चक्रीवादळाचा दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 73 हजार 760 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 10 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.  पालघर जिल्ह्यात 5 लाख 88 हजार 743 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता जवळपास 2 लाख 44 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यात 5 लाख 45 हजार 121 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता जवळपास 4 लाख 18 हजार 360 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 लाख 66 हजार 11 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता जवळपास 67 हजार 166 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. नाशिक जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 304 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 72 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 96 हजार 965 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 49 हजार 601 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात 4 लाख 36 हजार 768 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता तर 4 लाख 8 हजार 89 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात 1 लाख 66 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 48 हजार 112 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात 1 लाख 55 हजार 543 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 53 हजार 715 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. विदर्भात  एकूण 53 हजार 392 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर जवळपास 50 हजार  ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मराठवाड्यात 1 लाख 5 हजार 142 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 3 हजार 924 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

13 हजार तंत्रज्ञांची फौज तैनात
कोल्हापूर, पालघर,पुणे,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे इत्यादी साठी 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर 46 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नुकसानीची व्याप्ती बघता सुमारे 622 रोहित्रे, सुमारे 350 किमी लांबीचे केबल, तसेच साडे तीन हजार किमी इतक्या लांबीचे वायर्स व 20 हजार 500 खांब उपलब्ध करून दिलेले आहेत. नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने 13 हजार तंत्रज्ञांची फौज मैदानात उतरवली आहे. ज्यामध्ये स्वतःचे  9 हजारहुन अधिक तसेच कंत्राटी पध्दतीवर कार्यरत 4 हजारहून अधिक इतके मनुष्यबळ सध्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यरत आहे. तसेच या कामासाठी 200 हुन अधिक लहान मोठे ट्रक्स, सुमारे 50 क्रेन्स व जेसीबी मशीन आणि  सर्व उपकरणांनी सज्ज अश्या 200 चमू या कामासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.
  • राज्यात  एकूण 1546 उच्चदाब पोल वादळामुळे पडले व क्षतीग्रस्त झाले. त्यापैकी 425 पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे.
  • राज्यात एकूण 3940 लघुदाब पोल वादळामुळे पडले व क्षतीग्रस्त झाले  त्यापैकी 974 पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे.
  • वादळ व पावसामुळे राज्यात 93 हजार 935 रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता त्यापैकी 68 हजार 426 दुरुस्त करण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट