मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात 15 दिवस कडक लॉकडाऊनची शक्यता

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कडक लॉकडाऊनवर गंभीर चर्चा करण्यात आली.  

सध्या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्यातही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूकही अत्यावश्यक सेवेसाठी सुरु आहे. त्यामुळे कडक निर्बंध असले तरी त्याचा परिणाम हवा तेवढा होताना दिसत नाही. त्यामुळे 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी आज झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. असलम शेख यांच्या वक्तव्यानुसार 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत आहे. सध्याची परिस्थिती पाहाता 15 दिवस लॉकडाऊन लावावा अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे आणि त्यानुसार सरकार आता 15 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करु शकते.

आरोग्यमंत्री राजेश टोपें यांनी सांगितले की, उद्या रात्री 8 वाजल्यापासून हा कडक लॅाकडाऊन लावला जाईल अशी शक्यता आहे आणि मुख्यमंत्री या बद्दलचे वक्तव्य देतील. तसेच 10वी ची परीक्षा रद्द् करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. वर्षा गायकवाड या बद्दल अधिकृत घोषणा करतील असे ते म्हणाले. परंतु बारावीच्या परीक्षा या होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. त्याच बरोबरो लसीकरण करण्यावरती महाराष्ट्र शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट