मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मैफील फिलिंग्सची (बायकोवाली फिलिंग्स)

बायको म्हणजे जीवनाचा आधार असतो. पुरुषीपेक्षा स्त्री जास्त विचार करते? म्हणजे प्रत्येकाचे स्वप्न असते . आपल छोटसं घर असावं, सुखी परिवार असावा आणि त्या कुटुंबात आपल्याला पाठिंबा देणारी एक व्यक्ती असावी ती म्हणजे बायको 

बायको म्हणजे जीवनाची सोबती, जीवनाचा आधार आणि आयुष्यभरची साथ असते. खरचं ज्या व्यक्तिला बायको चांगली मिळाली तो व्यक्ति आयुष्यात कधीच दु:खी नसतो. बा म्हणजे आपल्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परितिथी साथ देणारी, को म्हणजे कोणासाठी न जागता आपल्यासाठी जगणारी ती म्हणजे बायको असते. आपण दैनंदिन आयुष्यात आपण गाडी चालवतो म्हणजे एका चाकाचा वेग वाढला तर दुसर्‍याचा चाकाचा वेग लगेच वाढतो, तेव्हा त्या गाडीला स्पीड मिळतो. त्याच पद्धतीने आपल्या दैनंदिन आयुष्यात असते,  म्हणजे नवर्‍याने वेग वाढवला तर बायकोला वेग वाढवायलाच लागतो किंवा बायकोने वेग वाढवला तर नवर्‍याला वेग वाढवायलाच लागतो तेव्हाच एक सुखी संसार होऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी बायको चिडली त्याठिकाणी नवर्‍याने शांतता घ्यावी असच दोघांनी एकमेकांना समजून घेण तितकच गरजेचं आहे. यालाच तर सुखी संसार आणि बायकोवाली फीलिंग्स म्हणतात. महाभारतात  युदिष्टीराने यक्षाला विचारलेला एक प्रश्न होता की, देवाने पृथ्वीवर पुरुषासाठी निर्माण केलेला एक उत्तम मित्र कोण? त्यावेळेस युदिष्टीराने पटकन उत्तर दिले.  ती म्हणजे बायको तसेच  पूर्वीच्या काळी जे स्थान आपल्या बायकोला होत तेच स्थान आजच्या काळात सुद्धा  आहे. पूर्वीच्या काळी वडील आपल्या मुलासाठी बायको शोधायचे पण आजच्या काळात मुलगा आपल्या वडिलांसाठी सून शोधत आहे. म्हणजे विचार आणि गोष्ट सारखी आहे फक्त जगण्याची पद्धत बदलली आहे. 

बायकांची एक गंमत म्हणजे त्यांच्या नवर्‍याने महिन्यातल्या पगारातील थोडे पैसे दिले तर त्यांना शॉपिंग, एंजॉय करायचा नसतो, तर नवर्‍याच्या आर्थिक संकटाच्या वेळी किचनमधल्या छोट्याश्या डब्यातून पाचशे आणि हजारची नोट नक्की निघते. का कारण त्यांना माहिती असते की नवर्‍याच्या आर्थिक संकटाच्या वेळी आपल्यालाच उभे राहायचे आहे. लग्न ही  एक अशी गोष्ट आहे की, जिला कधी भेटलो नाही जिच्याशी कधी बोललो नाही तिच्यासोबत आयुष्यभराच्या गाठी जोडायच्या असतात. प्रत्येक तरुण मुलांना वाटत असते की बायको ही आपल्याला आपल्यासारखी मिळायला, पण आपल्या आयुष्यात येण्यासाठी तिने तिचे आई - वडील सोडलेले असतात.

-प्रसाद भालचंद्र सोनवणे (अभिनेता / लेखक ) 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट