मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन

मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारे लॉकडाऊन राज्य सरकारने 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव संजयकुमार यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यात 14 ऑक्टोबर, 30 नोव्हेंबरच्या परिपत्रकात जाहीर केलेली लॉकडाऊनची स्थिती कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चपासून लॉकडाऊन घोषित केले. ज्या राज्यात कोरोनाचा प्रसार कमी होत आहे, त्याठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात आहे. त्या राज्यातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केले जात आहेत. महाराष्ट्रातही मिशन बिगीन अंतर्गत टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू केले जात असताना लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही बंदच राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने खासगी, शासकीय कार्यालये, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिरे, जिम, मैदानी खेळाचे सराव, मॉर्निंग वॉक आदीला परवानगी दिली आहे. मिशन बिगीन अंतर्गत सर्व व्यवहार सुरू होताना कोविडचे नियम पाळावेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

लोकलबाबत घोषणा नाही
मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमधून सर्व सामान्य नागरिकांना प्रवेश कधी दिला जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला लोकल ट्रेन सुरू होईल अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहेत. मात्र लॉकडाऊन वाढवताना सरकारने लोकल ट्रेनबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे लोकलसंदर्भात निर्णय झाल्यास घोषणा स्वतंत्रपणे होऊ शकते.
मुंबईतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद
मुंबईतील कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून 31 डिसेंबर पर्यंत मुंबईमधील शाळा सुरू न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. 31 डिसेंबरपर्यंत रुग्णांची संख्या किती याचा आढावा घेऊन मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 
अनेक ठिकाणी जमावबंदी
राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. गर्दी वाढल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी जमावबंदी लागू आहे. यानुसार पाचपेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाहीत.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट