मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रायगडमधील पर्यटन स्थळे खुली

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक

अलिबाग : ऐन दिवाळीत रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळं खुली करण्यात आली आहे. दरम्यान, इथे येणार्‍यांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे.  

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रायगडमधील सर्व पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात आली होती. अनलॉकच्या काळात रायगड पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहे.  रायगड जिल्हयातील सर्व गडकिल्ले आणि पर्यटन स्थळे तसेच स्मारके खुली करण्यात आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत. मागील आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सर्व ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. ही ठिकाणे खुली करावीत अशी मागणी विविध संस्था, संघटना, दुर्गप्रेमींकडून केली जात होती. आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे रायगड किल्ल्याबरोबरच चवदार तळे व इतर गडकिल्ले या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. शिवाय त्यावर आधारीत रोजगार पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र हे करताना कोरोना काळात सोशल डिस्टन्सींग, मास्क वापरणे यासारख्या आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट