मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जेएनपीटीच्या कार्गो हाताळणीत वाढ

लॉकडाऊन दरम्यान जेएनपीटीने केली 1,643,784 टीईयू आणि 694 जहाजांची हाताळणी 

उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हेभारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशांतर्गत आर्थिक व्यवहार सुरू झाल्याने जेएनपीटीमध्ये मालवाहतूकीमध्ये निरंतर वाढ झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जेएनपीटीला विविध आव्हानांचा सामना करावा लागला, तरी सुद्धा जेएनपीटीने 31ऑगस्ट,2020 पर्यंत 1,643,784 टीईयू आणि 694 जहाजांचीहाताळणी करीत उल्लेखनीय कार्य केले आहे. 

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या कालावधीत माल हाताळणीमध्ये35 टक्क्यांहून अधिक घट झाली होती, परंतु  ऑगस्ट महिन्यापर्यन्त हळू-हळू ही घट 16.61% पर्यंत खाली आली आणि आता पोर्ट आपल्या कोविडच्या पूर्व कामगिरीच्या पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आतापर्यंतच्या कामगिरीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की यापुढेही जेएनपीटी अशीच प्रगती सुरू ठेवेल. लॉकडाउन सुरू झाल्यापासूनच, जेएनपीटीने आपले भागधारक, कर्मचारी, शिपिंग कंपन्या आणि स्थानिक समुदायासाठी अनेक उपाय योजना केल्या. योग्य वेळेवर केल्या गेलेल्या या उपाययोजनांमुळे जेएनपीटी प्रत्येक महिन्यात आपल्या कामगिरीत सुधारणा करीत आहे. जेएनपीटीने जुलै 2020 महिन्यात हाताळणी केलेल्या 3,44,316 टीईयूच्या तुलनेत ऑगस्ट 2020 महिन्यात 3,52,735 टीईयूची मालाची हाताळणी केली आहे. ऑगस्ट, 2019 मध्ये जेएनपीटीने 5.68 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली होती, त्या तुलनेत ऑगस्ट, 2020 महिन्यात जेएनपीटीनेएकूण 4.74 दशलक्ष टनमालाची हाताळणी केली आहे. 

जेएनपीटीच्या कामगिरीविषयी बोलताना पोर्टचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, बंदरे ही  लॉजिस्टिक साखळीतील महत्त्वाचा दुवा असतात आणि गेल्या काही महिन्यांत जेएनपीटीने ही भूमिका अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली आहे. त्याचबरोबरगेल्या काही महिन्यात खालावलेल्या कामगिरीमध्ये होऊन आम्ही आता पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर आहोत. कोविड - 19 च्या साथीच्या काळात पोर्टचे कामकाज निरंतर सुरू ठेवण्यासाठी आणि लॉजिस्टिक सप्लाय चेन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आम्ही अनेक उपाय केले आहेत. त्याचबरोबर जेएनपीटी हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये रुपांतरित करून आम्ही स्थानिक समुदायाला या संकटातून मुक्त होण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट