NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भात, तूर, कापूस यांसह 14 पिकांच्या MSP त वाढ

भात, तूर, कापूस यांसह 14 पिकांच्या MSP त वाढ

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या 14 वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भाताच्या नवीन किमान आधारभूत किमतीचा दर २,३६९ रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो मागील किमान आधारभूत किमतीपेक्षा ६९ रुपये जास्त आहे.

कापसाची नवीन किमान आधारभूत किंमत ७,७१० रुपये निश्चित करण्यात आली आहे. याच्या दुसऱ्या प्रकाराचा नवीन एमएसपी ८,११० रुपये करण्यात आला आहे, जो पूर्वीपेक्षा ५८९ रुपये जास्त आहे. नवीन एमएसपीमुळे सरकारवर २ लाख ७ हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल.

शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वृद्धी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ कारळे (नायजरबियाणे) (प्रति क्विंटल 820 रुपये), त्यानंतर नाचणी (प्रति क्विंटल 596 रुपये), कापूस (प्रति क्विंटल 589 रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल 579 रुपये) करण्याची शिफारस केली आहे.

भाड्याने घेतलेले मानवी श्रमाची किंमत , बैल मजूरी/यंत्र कामगार, भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क, अवजारे आणि शेतीच्या इमारतींवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालविण्यासाठी डिझेल/वीज इत्यादी, विविध खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचे मूल्य, या सर्व चर्चांना विचारात घेऊन किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

वाढीव आधारभूत किंमतींचे तपशील जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वापरा.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट